कोणाचीही गय करणार नाही;खटला जलदगती न्यायालयात चालणार   

पिंपरी : वैष्णवी प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही. या प्रकरणाची चौकशी करून दोषींना कठोर शासन केले जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैष्णवीच्या कुटुंबीयांना आश्वासन दिले. तसेच, हा खटला जलदगती न्यायालयात चालविला जाईल, असेही ते म्हणाले.पवार यांनी शुक्रवारी कस्पटे  कुटुंबीयांची भेट घेतली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 
 
यावेळी ते म्हणाले की, मी पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनायककुमार चौबे यांना दोषींवर कठोर कारवाई करण्यास सांगितले. वैष्णवीच्या सासरा आणि दिर यांनाही अटक झाली आहे. कस्पटे परिवाराला न्याय मिळणे महत्त्वाचे आहे. मयुरीच्या संदर्भात विचारले असता ज्या पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत ही केस आहे. त्यांना त्याबाबत सांगण्यात आले आहे, असे पवार म्हणाले. पत्रकारांनी या विषयावर आणखी छेडले असता वकिलांपेक्षा तुम्हा पत्रकारांना जास्त ज्ञान आहे, असे पवार म्हणाले.

Related Articles